ज्याला व्यवस्थेने इतिहास दिलेला नसतो, भूगोल दिलेला नसतो, चालण्यासाठी चांगला वर्तमानही दिलेला नसतो, अशा माणसांना ग्रंथ खूप उपयोगी पडतात असं माझं मत आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी ग्रंथांच्या गावात गेलो नसतो, तर गावगाड्यातच राहिलो असतो. मला चार्वाक, बुद्ध, गांधी, आंबेडकर यांपैकी कोणीही दिसलं नसतं. त्यांच्या पाऊलखुणाही दिसल्या नसत्या. मांझी स्वतःची ओळख सांगण्यासाठी शब्दही मिळाले नसते. मी तसाच राहिलो असतो – बिनचेहऱ्याचा…! वाट गमावलेला…
( वाट तुडवताना )





Reviews
There are no reviews yet.