कमी जागेत चाऱ्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊन तो प्रक्रिया करून टिकवून ठेवण्याचा किफायतशीर पर्याय म्हणजे मुरघास निर्मिती तंत्र. जेव्हा चाऱ्याची टंचाई भासेल त्यावेळी गुणवत्ता टिकवून ठेवलेला चारा (मुरघास) वापरून आपण चारा टंचाईवर मात करू शकतो.
हिरवा चारा फक्त वाळवून ठेवून नंतर वापरल्यास त्यातील बरेचसे अन्नघटक कमी होतात. शिवाय अशा चाऱ्यातील पोषक घटकद्रव्ये कमी झाल्याने जनावरे तो चारा आवडीने खात नाहीत. या उलट, मुरघास पद्धतीत चाऱ्याऱ्यांवर किण्वन प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तो पचनास हलका बनतो. अन्नघटकांचे नियंत्रित प्रमाण आणि विशिष्ट चव व गंधामुळे जनावरे मुरघास आवडीने खातात.
हिख्या चाऱ्याला शास्त्रशुद्ध पर्याय देणारे, शेतकरी, कृषिअभ्यासक व तज्ज्ञांना उपयुक्त ठरणारे डॉ. एस.पी गायकवाड लिखित मार्गदर्शक पुस्तक कमी खर्चाचे मुरघास निर्मिती तंत्र





Reviews
There are no reviews yet.