“चरित्रग्रंथ स्फूर्तीदायी असतात. मग ते लोकोत्तर पुरुषांचे असोत की ‘मुंबई ग्राहक पंचायत’ सारख्या सेवाभावी संस्थांचे.
माणसाच्या मूलभूत गरजांपैकी प्रमुख असलेलं अन्न, शुद्ध व भेसळमुक्त स्वरूपात वेळच्या वेळी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने भारलेल्या काही ध्येयवेड्या तरुण मंडळींनी अतिशय कठीण परिस्थितीत रोवलेल्या संस्थेच्या या बीजाचा आज अर्धशतकानंतर वटवृक्ष झाला आहे. ‘लोकल’ पासून ‘ग्लोबल’ पर्यंत त्याने मजल मारली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेलाही या अभियानाची दखल घ्यावी लागली आहे.
या प्रवासात सतत बदलत्या सामाजिक रचनाबंधांना, आर्थिक परिस्थितीला, धान्य उत्पादनातील स्वयंपूर्णतेला आणि त्याचप्रमाणे समाजमनातील आंदोलनांना ही संस्था कशी सामोरी गेली, जगभरात ख्याती पावलेल्या अनोख्या आणि गतिमान वितरणप्रणालीची स्थापना कशी केली गेली तसेच त्यातून ग्राहक हिताची सुदृढ चळवळ कशी उभी राहिली, या सर्वाची माहिती रंजकपणे सांगणारा हा जिवंत आणि अनेकांना प्रेरणादायी ठरेल असा चरित्रग्रंथ…





Reviews
There are no reviews yet.