भूतकाळातील आठवणींची पिशाचे त्याला छळत आहेत. मित्र आणि शत्रू यांतली सीमारेषा धूसर झालेली भासत असते. काही झालं तरी त्याला विजयी होणं क्रमप्राप्त असतं… आणि त्यासाठी अंतरात्म्यातील सैतानावर मात करणं भाग असतं. त्यासाठी तो दीर्घ प्रवासाला निघतो. गंगेच्या खोऱ्यापासून हिमावंताची बर्फाच्छादित शिखरं अशी प्रचंड भ्रमंती करतो… इथले अपयश मृत्यूपेक्षा भीषण आहे. आणि अश्वत्थामा तर मृत्यूच्या वरदानापासून वंचित आहे.
ही सारी लीला भगवान श्रीकृष्णाचीच आहे का? अश्वत्थामा आपला गमावलेला लौकिक पुनश्च प्राप्त करू शकेल का? अशी कुतूहलं निर्माण करून ते शमवणारी कादंबरी… अश्वत्थामा: शापित योद्ध्याची ऋणमुक्ती !





Reviews
There are no reviews yet.